ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ‘ठाकरे’ होत नाही – अमृता फडणवीस

0
463

मुंबई,दि.२३(पीसीबी) – ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ‘ठाकरे’ होत नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट रिट्विट करत हा निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत निषेध केला होता. आडनाव गांधी असल्यामुळे कोणी गांधी होत नाही, असं फडणवीस म्हणाले होते. याच ट्विटला रिट्विट करत अमृता यांनी ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ‘ठाकरे’ यांच्यासारखे होत नाही, असं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे फडणवीसांनी १४ डिसेंबरला ट्विट केलं होतं. त्यानंतर २२ डिसेंबरला अमृता यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. ‘ठाकरे’ ज्यांनी कायम सत्य, आपली तत्वे आणि लोकांचा कायम विचार केला. यासाठी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान दिलं, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.