उध्दव ठाकरे भेटत नसल्याची तक्रार आजही कायम…

0
152

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – शिवसेनेतील बंडामागे एक कारण होते ते की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी वेळ देत नव्हते. भलेही या आमदारांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली असली तरी ते एक महत्वाचे कारण समजले जात होते. यावर विश्वास ठेवायचा की नाही हा जनतेचा प्रश्न आहे. पण एका शिवसैनिकाचीही नाराजी तीच राहिलेली आहे. दौंडमधील कट्टर शिवसैनिक असलेले मोहन यादव हे कुटुंबियांसमवेत मातोश्रीवर दाखल झाले होते. यापूर्वीही ते दाखल होताच बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवरुन खाली उतरत होते पण आता तसे होत नाही. सकाळी 8 वाजता मोहन यादव हे दाखल झाले असतानाही आपली पक्षप्रमुख यांनी भेटही घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

मोहन यादव हे दौंड येथील असून ते गेल्या 40 वर्षापासून कट्टर शिवसैनिक राहिलेले आहेत. यापूर्वीही ते शिवसेनेचा प्रचार करीत मातोश्रीवर आल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खाली उतरत असत. पण आता तसे झालेले नाही. मोहन यादव हे कुटुंबियांसोबत मातोश्रीवर दाखल झाले होते. पण त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही.

मोहन यादव हे उद्धव ठाकरे यांची भेट होईल म्हणून सकाळी 8 च्या दरम्यानच, मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यांनी भेटण्याचा प्रयत्नही केला पण त्यांना भेटता आले नाही. शिवाय पावसाची रिमझिम सुरु असताना ते तटस्थ होते. दुपारपर्यंत त्यांना भेट मिळालेली नव्हती. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडित झाल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनीही पक्षप्रमुख हे भेटण्यासाठी वेळच देत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मतदार संघातील विकास कामे तर मार्गी लागतच नव्हती पण आमदारांच्या नाराजीचे हे एक मुख्य कारण होते. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मोहन यादव यांची स्वत:ची भगवी अशी ओळख आहे. शिवाय ते गेल्या 40 वर्षापासून कट्टर शिवसैनिक राहिलेले आहेत. त्यांच्या लक्षणीय प्रचारामुळे ते मातोश्रीवर आल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील माझी भेट घेत होते असे त्यांचे म्हणणे होते. पण आता पक्ष प्रमुखांची भेट झाली नाही ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले आहेत.