नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी केंद्र सरकार नवीन प्रकल्पांच्या उद्धाटनांचा धडाका लावणार आहे. ज्या प्रकल्पांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे किंवा येत्या तीन महिन्यात हे प्रकल्प पूर्ण होतील अशा २५ प्रकल्पांची निवड पंतप्रधान कार्यालयाने केली आहे. या प्रकल्पांचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: करणार असून केंद्र सरकारचे चार वर्षांतील विकासकामे म्हणून याचा प्रचार करण्यात येणार आहे.