आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री – रामदास आठवले

0
571

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – आंबेडकरी जनतेचा विश्वास प्रत्यक्ष कृती करून जिंकणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची नोंद करावी लागेल. आंबेडकरी जनतेबरोबरच शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांची काळजी वाहणारे मुख्यमंत्रीही  ते ठरले आहेत, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी मुख्यमंत्र्यांच्या  कामावर स्तुतीसुमने उधळली आहेत.