अन्वरांचा राजीनामा बेजबाबदारपणाचा; कुणाच्या येण्या-जाण्याने पक्ष संपत नाही – प्रफुल्ल पटेल

0
394

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व खासदार तारिक अन्वर यांची इच्छा झाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. परंतु त्यांनी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला तो चुकीचा आहे. अन्वर यांचा राजीनामा बेजबाबदारपणाचा आहे. प्रत्येक पक्षात कोण येतं-कोण जातं, पण याचा अर्थ पक्ष संपत नाही,  अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.