खासदार नवनीत राणाचे नाव घेऊन नका त्यांनी दगा दिला ; काँग्रेसच्या सभेत गोंधळ

0
550

अमरावती, दि. २८ (पीसीबी) – अमरावतीत काँग्रेसची ‘महापर्दाफाश’ सभा झाली. या सभेत माणिकराव ठाकरे यांनी सुरुवातीला खासदार नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. मात्र सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी तसेच आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांना थांबविले. खासदारांचे नाव कशाला घेता, त्यांनी दगा दिला, असे त्यांनी म्हणताच, कार्यकर्त्यांनी राणा भाजपात पळाल्या, अशी आरडाओरड सुरू केली आणि सभेत एकच गोंधळ झाला .

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लगेच नवनीत राणा यांचा कल भाजपकडे असल्याची टीका काँग्रेस नेत्यांकडून होऊ लागली होती. राणा दाम्पत्याने भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या भेटी घेण्याबरोबर काँग्रेसपासून दुरावत असलेल्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

लोकसभेवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. त्या विजयी झाल्यावर भाजपमध्ये तर जाणार नाहीत, तसेच जिल्ह्यातील राजकारणात ढवळाढवळ करून विधानसभा निवडणुकीत दर्यापूर, मेळघाटमध्ये काँग्रेससमोर अडथळे तर निर्माण करणार नाहीत, अशा शंकांचे निरसन करून काँग्रेसने आमदार रवि राणा आणि नवनीत राणा यांच्याकडून एकनिष्ठेचे आश्वासन घेतले होते, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.