लोकसभा निवडणुकीत दानवेंना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- बच्चू कडू

0
784

अमरावती, दि. २२ (पीसीबी) – अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करुनच जालन्यातून परत येऊ, असा पण बच्चू कडू यांनी केला आहे..

रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांआधी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणून संबोधले होते. त्यांनी संबोधलेल्या या वाक्याचा आमदार बच्चू कडू यांनी जाहीर निषेध केला होताच, तर शेतकऱ्यांना साले संबोधणाऱ्या दानवेंच्या विरोधात आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभा निवडणूक लढवू, असेही त्यांनी जाहीर केले होते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जालना मतदारसंघातून आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.