’२६/११’  दहशदवादी हल्ल्यातील शहीदांना मानवंदना !

0
727

 

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) –      ‘२६/११’ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना मंगळवार (दि.२६) रोजी जगताप डेअरी येथे उदय चोंधे युवा मंच तर्फे श्रध्दांजी अर्पण करुन मानवंदना देण्यात आली.

 

११ वर्षापुर्वी झालेल्या ‘२६/११’ च्या दहशतवाली हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अपर पोलिस आयुक्त अशोक रामटे, पोलिस निरीक्षक विजय साळसकर, शशांक शिंदे, मेजर उन्नीकृष्णन, सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे हे अधिकारी शहीद झाले होते.तसेच १६६ नागरिकांना प्राण गमवावा लागला. यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या दिवशी ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

 

यावेळी युवा मंचचे अध्यक्ष उदय चोंधे, सदस्य संकेत चोंधे, सुरज चोंधे, आकाश जाधवर, आकाश दादर, कुशल गुंजाळ, गजेंद्र लाड, चंद्रकांत धांडे, भुषण गोसावी, सुभोद जगताप, प्रतिक टेंभुर्णीकर, प्रतिक राठोड, शाहरुक सय्यद, आकाश खवळे, तुषार करबे, इजाज इनामदार, रणजित बाले, साईबाज शेख, अनिकेत खरात, निखिल मदने, गणेश मदलियार, अनिकेत कामठे तसेच नवनाथ मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.