१४ वर्षांचा वनवास संपला साहेब, लवकरच अयोध्येकडे कूच करावी लागणार – बाळा नांदगावकर

0
880

मुंबई,दि.९(पीसीबी) – १४ वर्षांचा वनवास संपला साहेब, लवकरच अयोध्येकडे कूच करावी लागणार, असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. आज मनसेचा १४ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाळा नांदगावकर बोलत होते.

वर्ष पूर्ण करून आपण पुढे निघत आहोत. वनवास जवळपास संपल्यात जमा आहे. आता हा रामाचा वनवास संपवून आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

मनसेला वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी, सर्व नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. १४ वर्षांचा हा प्रवास खाचखळग्यांनी जरी असला तरी तो आपण स्वाभिमानानं पार केला, असं बाळा नांदगावकरांनी सांगितलं.