सिंचन घोटाळ्याप्रकरणी सूडबुध्दीने कारवाई नाही; अजून अनेक नांवे समोर येतील – गिरीश महाजन  

0
474

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – सिंचन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या कोणत्याही तपास यंत्रणेवर सरकारचा दबाव नाही. एसीबीने कारवाई केली आहे. ते चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आहेत. निवडणुका किंवा अधिवेशन डोळ्यासमोर ठेऊन कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. अजून अनेक प्रकरणे बाहेर यायची आहेत, अनेक नावे समोर येणार आहेत. जे दोषी आढळले आहेत, त्या सर्वांवर  कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे राज्याचे जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांनी आज (बुधवार)  स्पष्ट केले.