मुंबई, दि.३० (पीसीबी) – महिनाभरापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज (३० डिसेंबर) मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. तर दुसरीकडे २०१९ हे वर्ष संपण्यास अवघा एक दिवस शिल्लक आहे. या दोन्ही घटनांचा मेळ साधत शिवसेनेने भाजपाच्या चार दिवसांच्या सत्ता स्थापनेच्या जखमेची पुन्हा खपली काढली आहे. “सरत्या वर्षाकडून काय शिकायला मिळाले, तर मित्राशी अहंकाराने वागू नये, दिलेला शब्द मोडू नये व अंधारात लपूनछपून सरकार बनवू नये,” असे म्हणत शिवसेनेने भाजपाच्या वर्मी घाव घातला आहे.