सध्याच्या काँग्रेस पक्षात सोनिया गांधी, वसंतदादांचा विचार राहिलेला नाही;  प्रतीक पाटलांचा राहुल गांधींवर निशाणा

0
490

मुंबई, दि. २५ (पीसीबी)-  ‘सोनिया गांधी, राजीव गांधी यांच्या काळात काँग्रेस पक्ष ज्या विचाराने चालत होता तसा आता राहिलेला नाही,’ अशी खंत दिंवगत वसंतदादा पाटील यांचे नातू माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी व्यक्त केली आहे. सांगली लोकसभेची जागा शेतकरी संघटनेला दिल्यानंतर नाराज झालेल्या प्रतिक पाटील यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रतिक पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त केली आहे. “सध्याचा काँग्रेस पक्ष हा सोनिया गांधी, राजीव गांधी यांच्या काळातला पक्ष राहिला नाही. सोनिया गांधींनी माझ्यावर विश्वास टाकला होता. काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राहुल गांधींना यांना भेटण्यासाठी वारंवार प्रयत्न केले पण त्यांनी वेळ दिली नाही”, असे म्हणत प्रतीक पाटील यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. एका कार्यक्रमात ते  बोलत होते.