शिरूर, मावळमध्ये राष्ट्रासाठी संपत्ती निर्माण करण्याची क्षमता; आढळराव आणि बारणेंनी काय केले नक्की वाचा…

0
673

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात निसर्गसौंदर्याने संपन्न अनेक धार्मिक व पर्यटन स्थळे, ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान देहू आणि आळंदी याच दोन मतदारसंघांमध्ये येतात. त्यामुळे पर्यटनातून राष्ट्रासाठी संपत्ती आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याची या दोन मतदारसंघात प्रचंड मोठी क्षमता आहे. हिंदुत्व, मराठी आणि शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणारी शिवसेना या दोन्ही मतदारसंघात सतत विजयी झाली आहे. निवडणूक प्रचारात मावळ आणि शिरूरमध्ये खूप मोठा विकास केल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी पर्यटनवाढीला चालना देण्याची क्षमता असणाऱ्या आपापल्या मतदारसंघात राष्ट्रासाठी किती संपत्ती निर्माण केली आणि किती स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला याचा दुर्बिणीतून शोध घ्यावा लागेल, अशी वस्तुस्थिती आहे.