शरद पवार पत्रकारावर का भडकले? मुख्यमंत्री म्हणतात…

0
860

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  शरद पवार साहेब मोठे आहेत. मी जास्त बोलणार नाही.  पवार साहेबांनी अनेक पक्ष बनवले-तोडले आहेत. अनेक राजकीय खेळी ते खेळले आहेत. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या पक्षातून लोक बाहेर चालले आहेत. पण  पवार यांना राग का येतो ? यावर मी कॉमेंट करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अहमदनगर दौऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार गेले होते. यावेळी एका पत्रकाराने  पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीतून आता नातेवाईकही बाहेर पडत आहेत, असा  प्रश्न  पवारांना  विचारला होता . यावर ते पत्रकारावर चांगलेच  भडकले होते.

पवारांच्या या कृतीवर देवेंद्र फडणवीस यांना  प्रश्न विचारण्यात आला. यावेळी  त्यांनी आपल्या खास शैलीत थेट  उत्तर  देण्याचे टाळले. फडणवीस म्हणाले की,  पंतप्रधान  मोदी यांच्या नेतृत्त्वावर लोकांचा विश्वास आहे. राजकारणामधील तरुणांना मोदींवर विश्वास आहे. यामुळे लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.