लोकसभेत प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे अव्वल; सातारच्या उदयनराजेंनी एकही प्रश्न उपस्थित केला नाही

0
597

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – १६ व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन १३ फेब्रुवारी रोजी संपले. लोकसभेत ५ वर्षांतील खासदारांची सक्रियता व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आकडेवारी पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च या वेब पोर्टलने नुकतीच जारी केली आहे. या रिपोर्ट कार्डनुसार १६ व्या लोकसभेत पाच वर्षांत प्रश्न विचारणाऱ्या देशभरातील टॉप-१० खासदारांपैकी एकट्या महाराष्ट्राचे ८ खासदार आहेत. देशातील ९३ टक्के खासदारांनी १.४२ लाखांपेक्षा जास्त प्रश्न विचारले. सर्वाधिक प्रश्न शेतकरी आत्महत्यांवर विचारण्यात आले.