मुंबई, दि. १६ (पीसीबी) – ‘लालबागचा राजा’ गणपती मंडळावर सरकारी नियंत्रण आणण्याचा धर्मादाय आयुक्तांनी घातलेला निर्णय चुकीचा आणि एककल्ली आहे. मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची भाषा करणाऱ्या धर्मादाय आयुक्तांचा ‘बोलविता धनी’ नेमका कोण? असा सवाल करून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हिंदूंच्या सणांना आडकाठी करू नये. भाजप सरकारने चालविलेले हे नसते उद्योग त्वरित थांबवावे, असा इशाराही शेवाळेंनी यावेळी दिला.