राहुल गांधी भारताचे नागरिक आहेत का?: भाजपचा सवाल

0
328

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले होते. याच कारणामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली आहे. ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या एका कंपनी कागदपत्रांच्या आधारे रवी प्रकाश यांनी हा दावा केला आहे. या बरोबरच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही त्यांनी आरोप केले आहेत. या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) कांग्रेस पक्षाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.