राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असे देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो – आ.रोहित पवार

0
390

 

मुंबई, दि.३ ( पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. रोहित पवार यांनी मोदींच्या आवाहनाचे स्वागत केले आहे. दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हेतू असावा. तसे असेल तर त्याचं स्वागतच करायला हवे,’ असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या आवाहनावर संताप व्यक्त केला आहे. जनतेच्या आयुष्यात अंधार असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिला आहे. त्यात रोहित पवार यांनी मोदींच्या आवाहनाचे स्वागत केले आहे. रोहित पवारांनी पुढे ट्विट करत जनतेला अजून एक अवाहन केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असे देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो,’ असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.