मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यावर मनसेने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्वार्थही ओशाळला असेल, अशी टीका मनसे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विटरवर केली आहे.
पावणेपाच वर्ष विरोधी पक्षनेतेपदावर राहून सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर राजकारण करणे, नंतर ऐन निवडणुकीच्या आधी मुलाला पक्षात पाठवून नंतर आपणच मंत्रीपद पदरात पाडून घेणे याने स्वत: स्वार्थही ओशाळला असेल, महाराष्ट्राबरोबर, अशी टीका मनसे नेते अनिल शिदोरे यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारत विखे पाटील यांना कॅबीनेट मंत्रीपद देण्यात आले. विखे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. विखे यांना गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.