राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यास तो त्यांचा डेड एंड ठरेल-भाजपा

0
305

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले तर तो त्यांचा राजकारणातला डेड एंड असेल असं वक्तव्य भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी केलं आहे. राज ठाकरेंच्या सभांचा काहीही परिणाम झाला नाही. ज्या ठिकाणी मोदी आणि शाह यांच्याविरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतली, सभा घेतल्या त्याचा आम्हाला फायदा झाला. त्यांच्या सभांची चर्चा भरपूर झाली होती. त्यांच्या भाषणांना गर्दीही झाली होती मात्र गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये होऊ शकलं नाही असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत अतुल भातखळकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.