पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली तर उत्तमच आहे. युतीच्या जागा वाटपात भाजपने मावळ मतदारसंघातून आपणाला उमेदवारी दिली, तर निश्चितपणे निवडणूक लढवणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तर निवडणुकीत जिंकून येणाऱ्याला उमेदवारी देण्यात यावी. जे बुथप्रमुख सुद्धा नेमू शकत नाहीत, अशांना उमेदवारी देऊन पराभव झाला, तर शिवसेनेने निवडणुकीनंतर आम्हाला जबाबदार धरू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Home Notifications युती झाल्यास मावळमधून जिंकणाऱ्याला उमेदवारी द्या; अन्यथा पराभवास आम्हाला जबाबदार धरू नका...