….यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनीही कर्ज भरू नये – नितेश राणे

0
420
मुंबई, दि.२५ (पीसीबी) – सध्या राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. आमचे सरकार केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगत कर्ज माफ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.
तसेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. तर यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनीही कर्ज भरू नये असे म्हणत भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.