नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – तुम्ही घृणास्पद असल्याने काश्मीरी तरुणी तुमच्याशी लग्न करत नाहीत, असे टीका इंग्रजी लेखिका प्रेरणा बक्षी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील तरुणांवर केली आहे. प्रेरणा यांच्या या ट्विटवर अनेक संघ समर्थकांनी टीकेचा भडीमार सुरू केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरी मुलींशी लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. यावर प्रेरणा यांनी ट्विटवरुन संघाच्या स्वयंसेवकांना उत्तर दिले आहे.
प्रिय संघ स्वयंसेवक काश्मीरी मुली तुमच्याशी लग्न न करण्यासाठी कलम ३७० किंवा इतर कोणतेही कारण नाही. तर इतर महिलांप्रमाणे काश्मीरी महिलांना तुम्ही घृणास्पद वाटता, असे या निर्णयामागे एक कारण आहे, असे ट्विट प्रेरणा यांनी केले आहे.
तसेच एखाद्या काश्मीरी मुलीबरोबर संघाच्या स्वयंसेवकाचे लग्न झाले. तर ते आई वडिलांच्या दबावामुळे जुळवून आणलेले लग्न असेल. कोणत्याही योग्य मनस्थितीच्या महिलेला तुमच्याशी लग्न करायला आवडणार नाही, असेही प्रेरणा यांनी दुसरे ट्विट केल्या आहे.