मोबाईल कोठून आणल्याचा जाब विचारल्याने सुनेने सोडले घर; २० दिवसांपासून बेपत्ता

839

पौड, दि. १९ (पीसीबी) – सासरकडच्यांनी सुनेला मोबाईल कोठून आणला आणि कोणी दिला असे विचारले असता सुनेने घर सोडले. मागील २० दिवसांपासून ती बेपत्ता आहे. ही घटना रविवारी (दि. ३० जून) माले मधलीवाडी ता.मुळशी येथे घडली.

अश्विनी दत्तात्रय नलावडे (वय ३२, रा. माले, मधलीवाडी, ता मुळशी) असे बेपत्ता सुनेचे नाव आहे. याप्रकरणी सासू ताराबाई हरीशचंद्र नलावले (वय ६१, रा. माले, मधलीवाडी, ता मुळशी) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी ही पती दत्तात्रय, सासू ताराबाई सासरे हरीशचंद्र आणि दोन मुलांसह माले, मधलीवाडी येथे राहत होती. रविवारी (दि.३० जून) अश्विनीकडे मोबाईल असल्याने सासू ताराबाई यांनी, तु मोबाईल कोठून आणला, कोणी दिला असे विचारले. यावर रागावलेल्या अश्विनीने घर सोडले. घरच्यांनी अश्विनीचा मागील २० दिवसांपासून सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेही सापडली नाही.

अश्विनीचे वर्णन खालीलप्रमाणे.

रंग गोरी, उंची ५ फुट २ इंच, अंगामध्ये लाल रंगाचा कुर्ता व गुलाबी रंगाचा पायजमा, अंगामध्ये चॅकलेटी रंगाचे जरकिंग, गळ्यामध्ये सोन्याचे मनीमंगळ दोन्ही हातात बेनस्टेक्सच्या बांगड्या, पायात लाल रंगाची चप्पल , भाषा मराठी, हिंदी बोलते. अश्विनी बाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी पौड पोलिस किंवा ७०३०५२२६११ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.