मोदी ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ – राहुल गांधी

0
413

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी भारताचे  ‘प्राइम टाइम मिनिस्टर’तीन तास व्हिडीओ शुटींग करण्यात मश्गूल होते, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.  

पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत होत्या. मात्र, मोदी  पाण्यामध्ये सुहास्य वदनाने चित्रीकरण करीत होते, असे गांधी यांनी ‘फोटोशूटसरकार’ या हॅशटॅगखाली ट्वीट केले आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याची माहिती  आल्यानंतरही तीन तास प्राइम टाइम मिनिस्टर चित्रीकरणामध्ये व्यस्त होते, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतरही मोदी सायंकाळपर्यंत चित्रीकरणात व्यस्त होते.  सायंकाळी सात वाजता मोदी यांनी समोसा आणि चहाचा आस्वाद घेतला, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.