…तर मी आणि सुशिलकुमार शिंदे कधीच पराभूत झालो नसतो – नारायण राणे

0
584

पंढरपूर, दि. २३ (पीसीबी) – कामे करून निवडून येता येते, हा समज चुकीचा आहे.  यावर माझा विश्वासही नाही.  तसे असते, तर आयुष्यभर लोकांची कामे करणारे मी आणि सुशीलकुमार शिंदे निवडणुकीत कधीच पराभूत झालो नसतो,  अशी खंत  माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.

पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात राणे बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते व  माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी राणे म्हणाले की,  कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करता माझा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. किती जागा लढवायच्या ते अद्याप निश्चित झालेले नाही.  युती करणार नाही, अशी गर्जना करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी लाचारी पत्करली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.