अमृतसर, दि. २२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या गुरूवारी (दि.२३) लागणाऱ्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले असताना पाकिस्तानचेही विशेष लक्ष लागून राहिले आहे. कारण सर्जिकल स्ट्राईकची धास्ती अद्यापही नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे पुन्हा सत्तेवर येऊ नये, अशा प्रतिक्रिया पाकिस्तानातील नागरिकांनी सोशल मीडिया आणि पाकिस्तानातील वृत्तवाहिनीवर दिल्या आहेत.
भारतात पुन्हा मोदी यांचे सरकार येऊ नये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाकिस्तानी नागरीक देत आहेत. पाकमधील सोशल मीडियावर अशाच प्रकारची प्रतिक्रिया उमटत आहेत. मोदींना पुन्हा सत्तेत यायला नको. त्यांनी पाकिस्तानात सर्जिकल स्टाइक केले आहे, असे मत लाहोरमध्ये वास्तव्याला असलेले शाही आलम यांनी दिली आहे.
दरम्यान, मोदी बहुमताने सत्तेवर येतील, असे आपल्याला वाटत नाही, असे एजाज या पाक नागरिकाने म्हटले आहे. मोदींना बहुमत मिळणार नाही आणि पाकिस्तानसाठी ते चांगले आहे, असेही एजाज म्हणाले. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र काही महिन्यांपूर्वी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोदी यांनी २०१९ची निवडणूक जिंकली, तर दोन्ही देशांदरम्यानच्या शांततेच्या चर्चेसाठी चांगली संधी निर्माण होईल, असे इम्रान खान यांनी म्हटले होते.