नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील मोठे नेते आहेत. मात्र, २०१४ सारखी लाट आता असल्याचे दिसून येत नाही, असे निवडणूक रणनीतीकार आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या तरी भाजप आघाडीवर आहे. परंतु निवडणुका या १० ते १२ दिवसांत बदलतात. आज निवडणूक झाली, तर भाजपच सर्वांत मोठा पक्ष असेल, यात कोणतीही शंका नाही. मात्र, एकट्या भाजपला २७२ जागा मिळणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.