मुख्यमंत्री फडणवीस रात्री ३ वाजता माझ्या मेसेजला उत्तर देतात – शाहरूख खान

0
1916

मुंबई, दि. २ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस पहाटे ३ वाजता माझ्या मेसेजला उत्तर देतात, असे अभिनेता शाहरुख खान याने मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितले. फडणवीस हे माझ्या संकटकाळी धावून येणारे मित्र आहेत. मला काही अडचण आल्यास मी पोलिसांना फोन करण्यापेक्षा त्यांना फोन करतो, असेही ते म्हणाले.  

आपण उशीरापर्यंत जागी आहोत, दुसरेही जागी असतील म्हणून त्यांना त्रास देणे मला पटत नाही. परंतु, फडणवीसांच्या बाबतीत माझा अनुभव वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांना स्वत:च्या कामावर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांना वेळेचे भान राहत नाही,  अशा शब्दांत शाहरूख खान यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहरुखने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. तुमच्यामध्ये मुंबईत बदल घडवण्याची एक तीव्र इच्छा दिसते. तुम्हाला मुंबईत बदल घडवावा असे का वाटते ? मुंबईत कसा बदल घडून येणार ? असे प्रश्न शाहरुखने मुख्यमंत्र्यांना विचारले.