‘मी टू’ मोहीमेमुळे महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल – शिवसेना आमदार

756

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – ‘मी टू’ मोहीम ही सुशिक्षित महिलांसाठी एक हत्यार ठरत आहे. या मोहीमेमुळे महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल, असे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. एखादी महिला पाच वर्षानंतर तक्रार करेल, या भीतीनेच महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात राज्य महिला आयोग आणि समाजसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयक कायदे यावरील कार्यशाळेत ते  बोलत होते.

‘मी टू’ मोहीमेबाबत आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘मी टू’ चा अर्थ मला कळालेला नसून मलाच ‘मी टू’ची भीती वाटते. संसाराचा सुरळीत चालवणे, ही महिलांची जबाबदारी आहे. पण आता कोणती महिला काय आरोप करु शकेल, हे सांगता येत नाही. साडी दिली नाही म्हणून विवाहित महिला पतीविरोधातही ‘मी टू’ म्हणणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.विमा योजनेत पुरुषांसाठी विमा दिला जातो. यात पुरुषाला काही झाल्यास महिलेला भरपाई मिळते.मात्र, पत्नीचे निधन झाल्यावर पुरुषांना काय मिळते, असा सवाल त्यांनी केला.