महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आलाय – संजय राऊत

0
404

मुंबई,दि.२८(पीसीबी) – आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे. नवं सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनू नये यासाठी सर्व पर्याय वापरले गेले. परंतु आता हे सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. आमच्यावर कोणत्याही सरकारी एजन्सीचा वापर केला तरी काहीही फरक पडणार नाही,” असं राऊत यावेळी म्हणाले.

“काल उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संभाषण झालं. त्यावेळी त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. तसंच महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे,” असं त्यांनी सांगितलं.