महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट

0
366

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. राज्यपालांनी रिपोर्ट पाठवला नाही तर हे सर्वपक्षीय आहे असं आम्ही समजू असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्ममंत्री उध्दव ठाकरे यांनी आता महत्वाच्या मंत्र्यांची एक स्वतंत्र बैठक निमंत्रीत केली आहे. तिकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दिल्लीतून हालचाली करत आहेत. काँग्रेस अगदीच तटस्थ भूमिकेत असल्याने गूढ वाढले आहे.