महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

0
161

कोल्हापूर, दि. २ (पीसीबी) – लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तुषार गांधी हे कोल्हापूरकडे रवाना झले आहेत.

अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. 14 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय होते.