मला किती लाठ्या मारा. माझ्याभोवती माता-भगिनींचे सुरक्षा कवच आहे

0
342

दिल्ली, दि.७ (पीसीबी) – लोकसभेत शुक्रवारी राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन हंगामा झाला. हा गदारोळ इतका वाढला की खासदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. खरंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चांगलाच समाचार घेतला होता. ” मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करुन स्वतःला दंडाप्रुफ करुन घेईन. माझी जनताच माझे संरक्षण कवच आहे” असे उत्तर नरेंद्र मोदींनी दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या ‘दंडा मार’ वक्तव्यावरुन त्यांना सुनावले आहे. मला किती लाठ्या मारा. माझ्याभोवती माता-भगिनींचे सुरक्षा कवच आहे. हे कवच मला काहीही होऊ देणार नाही असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर सहा महिन्यात देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठी-काठीने चोपतील ” असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना उत्तर दिले आहे.