मराठा आरक्षण हेच सरकार देईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

0
397

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी हवे, तर आज अध्यादेश काढू शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) येथे दिली. मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू, जर कोणी आरक्षण देईल तर ते हेच सरकार देईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.