मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय? – शरद पवार

0
537

अहमदनगर, दि.१३ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस   यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मधुकर पिचड यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. आदिवासींचा विकास करण्यासाठी पक्ष सोडून गेलो असे सांगतात, मग काय चाळीस वर्षे गवत उपटत होतात काय? असा घणाघात त्यांनी केला.

अहमदनगरमधील अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली. अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय?, असा सवाल पवार यांनी यावेळी केला. पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही हातवारे करत टीका केली. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची असे म्हणत त्यांनी पुन्हा हातवारे केले. समोर पैलवान नाही म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पहायला येतात का? असा सवालही त्यांनी केला.