भारतीय वायूसेनेच्या अभिमानास्पद कामगिरीला राहुल गांधींनी केला सलाम !

0
483

नवी दि्ल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारतीय वायूसेनेच्या मिराज विमानांनी आज ( मंगळवारी) पहाटे पीओकेत घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले.   भारतीय वायूसेनेच्या या अभिमानास्पद कामगिरीचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कौतुक करून  सलाम केला आहे.  याप्रकरणी त्यांनी  ट्विट केले आहे.

भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी  पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकले. भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.   पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे.

या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळून लावले आहे.