भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय; मालिकेत बरोबरी

0
465

अॅडलेड, दि. १५ (पीसीबी) – कर्णधार विराट कोहलीचे शतक (१०४ धावा) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (५५ धावा) अर्धशतकीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू व ६ गडी राखून विजय मिळवला. शॉन मार्शचे (१३१ धावा) शतक व्यर्थ ठरले. अखेरच्या षटकात ७ धावांची गरज  असताना  धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे.