भाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर

0
526

जालना, दि. ९ (पीसीबी) – मित्र पक्ष भाजपने शिवसेनेची वाट लावण्याचे कारस्थान सुरू केले आहे. याला मित्र म्हणावे का वैरी?  असा सवाल करून मागच्या वेळी युतीमुळे आम्ही भाजपच्या उमेदवारांसाठी टेबल लावले होते, मात्र, आता त्यांची वाट लावणार, असा  इशारा  शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नांव न घेता दिला.

बदनापूर येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात खोतकर यांनी पुन्हा एकदा जालना लोकसभा लढवणार असल्याचा पुनरूच्चार केला.