पुणे, दि. ९ (पीसीबी) – भाजप -शिवसेनेच्या २०१४च्या निवडणुकीत ४२ जागा जिंकून आल्या होत्या. यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामतीची असेल. येथे कमळ फुलवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागा लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणीस म्हणाले की, २०१४च्या निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामतीमध्ये भाजपची जागा निवडून येईल. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात काही जण मुलाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला त्यांनी सोनिया गांधी यांचे नांव न घेता लगावला.