पुणे, दि. ९ (पीसीबी) – भाजप -शिवसेनेच्या २०१४च्या निवडणुकीत ४२ जागा जिंकून आल्या होत्या. यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामतीची असेल. येथे कमळ फुलवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागा लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.