पुणे, मुंबईच्या चाकरमन्यांनी गावे बाधित केली

0
293

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) : पुणे, मुंबई शहरातून महाराष्ट्रात आपापल्या गावी गेलेल्या चाकरमन्यांनी त्या भागात कोरोनाचा प्रसार केल्याचे आता समोर येते आहे. विदर्भातील नागपूर,अकोले, यवतमाळ, कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी तर माठवाड्यातील ग्रामिण भागातही हा प्रसार झाला आहे. अहमदनगरमध्ये आतापर्यंत 54 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यात एकूण 94 कोरोनाबाधित असून यात जिल्ह्यातील ७५ तर उर्वरित 19 जिल्ह्याबाहेरील आहेत. यातील 54 जण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे आता केवळ 40 जणांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे यातील 19 व्यक्ती या जिल्ह्याबाहेरील आहे. त्यामुळे मुंबई -पुण्यावरुन अशा बाहेरुन आलेल्या व्यक्तींमुळे जिल्हातील रुग्ण संख्या वाढत आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाने 2065 नमुने तपासले आहेत. त्यापैकी 1922 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर दहा व्यक्तींचे अहवाल परत पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या जिल्ह्यात संगमनेर, कर्जत तालुक्यातील राशीन, अहमदनगर शहरातील मध्य वस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरात येत्या 04 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला. या ठिकाणी कोणाला काही अत्यावश्यक असल्यास त्यांच्यासाठी पालिकेने फोन नंबर दिले आहेत.

हॉटस्पॉट असलेला भाग
सध्या जिल्ह्यात संगमनेर शहर, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, कर्जत तालुक्यातील राशीन, नगर शहरातील मध्यवर्ती भाग हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातील कारखाना परिसर पूर्णपणे सील करण्यात आले असून हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहे. तर जामखेड , नगर शहरातील मुकुंदनगर, आलमगीर, कोपरगाव, नेवासा हे भाग हॉटस्पॉट शिथिल करण्यात आलेला आहे.