पिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन

0
897

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पवना धरण व पिंपरी-चिंचवड परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग चालू आहे. परिणामी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. आपतकालीन परीस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच आठही क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष (०२० – ६७३३१५५६ व ३९३३१४५६), मुख्य अग्निशमन केंद्र (१०१, ०२० – २७४२३३३३, ०२० – २७४२२४०५, ९९२२५०१४७५), अ क्षेत्रिय कार्यालय (०२० – २७६५६६२१, २७६४१६२७, ९९२२५०१४५३, ९९२२५०१४५४), ब क्षेत्रिय कार्यालय (०२० – २७५०१५३, ९९२२५०१४५५, ९९२२५०१४५६), क क्षेत्रिय कार्यालय (०२० – २७१२२९६९, ९९२२५०१४५७, ९९२२५०१४५८), ड क्षेत्रिय कार्यालय (०२० – २७२७७८९८, ९९२२५०१४५९, ९९२२५०१४६०), ई क्षेत्रिय कार्यालय (०२० – २७२३०४१०, २७२३०४१२, ८६०५७२२७७७), फ क्षेत्रिय कार्यालय (०२० – २७६५०३२४, ८६०५४२२८८८), ग क्षेत्रिय कार्यालय (७७८७८६८५५५, ७८८७८७९५५५), ह क्षेत्रिय कार्यालय (०२० – २७१४२५०३, ९१३००५१६६६, ९१३००५०६६६) या दूरध्वनी क्रमांकावर किंवा मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

नागरिकांसाठी पूर परिस्थितीमध्ये एकमेंकाना सहकार्य करुन प्रशासनास मदत करावी, नदीकाठच्या क्षेत्रातील रहिवाशांनी पूर आल्यास सतर्क राहून स्वतःहून पर्यायी ठिकाणी अथवा संक्रमण शिबारामध्ये स्थलांतरित होऊन जीवित व वित्त हानी टाळावी, पावसाळयात ओल्या रस्त्यावरुन विशेषतः वळणावर वाहन नियंत्रित वेगाने व सावकाश चालवावे, पावसापासून बचाव करण्यासाठी झाडे तसेच पडक्या इमारती, भिंती, जाहिरात फलक, मोबाईल टॉवर यांच्या जवळपास थांबू नये, विजा चमकताना झाडांखाली थांबू नये, घरातील विजवाहक तारा तसेच विदयुत उपकरणे यांची तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी, पावसात रस्त्यावरील विजवाहक तारा, विजेचे खांब, डीपी बॉक्स, फीडर बॉक्स इत्यादी विदयुत वाहक ठिकाणी संपर्कात येवू नये. तसेच अशा ठिकाणी जनावरे जावू देऊ नये व बांधू नये.

रस्त्यांवरील साचलेल्या पाण्यातून, नाल्यांतून आणि पुलांवरुन पाणी वाहत असताना जावू नये. पुराचे वाहत्या पाण्यात पोहू नये. पावसाळयात पूर स्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ‍ ठिकाणी वास्तव्य करु नये. औदयोगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करु नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात. त्यामुळे त्यापासून नागरीकांनी जपून रहावे. असे अवाहनही अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांना केले आहे.