गुवाहाटी, दि. १३ (पीसीबी) – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र, आसाममधील पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकांवर आहे.