पवारांच्या परवानगीशिवाय ते पत्र वाधवान कुटुंबाला मिळणे अशक्य आहे – किरीट सोमय्या

0
375

मुंबई,दि.१०(पीसीबी) – पवारांच्या परवानगीशिवाय ते पत्र वाधवान कुटुंबाला मिळणे अशक्य आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

वाधवान कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय यांच्यात जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या परवानगीशिवाय वाधवान यांना यांना पत्र मिळणं अशक्य आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, शरद पवार आणि वाधवान कुटुंबाचे घरगुती संबंध आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणूनच पवारांनी किंवा देशमुखांनी जो आदेश दिला तो आदेश त्या अधिकाऱ्याने पाळला. म्हणून मी म्हणतो की पवारांच्या परवानगीशिवाय ते पत्र वाधवान कुटुंबाला मिळणे अशक्य आहे, असं सोमय्या म्हणाले.