मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आम्ही सत्तेत आल्यावर काळा बाजार करणाऱ्यांना फासावर लटकवू, असे आश्वासन भारताचे दिवंगत पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी दिले होते. त्या घोषणेचे काय झाले? पंडित नेहरू गेले, त्यांच्या पिढ्या गेल्या मात्र काळा बाजार करणारे अजूनही देशात आहेतच, असे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.