नियोजित जागीच शिवरायांचे स्मारक होईल – मुख्यमंत्री फडणवीस

0
555

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – छत्रपती शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात ज्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येईल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाची जागा बदलण्याविषयी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. एका  वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एखादा अपघात झाला म्हणून स्मारकाची जागा बदलण्याची काहीही गरज नाही, हा अपघात दुर्देवी असून त्यासाठी  स्मारकाची जागा बदलण्याची काहीही गरज नाही,  असे त्यांनी स्पष्ट केले.

या स्मारकाची जागा आघाडी  सरकारने निश्चित केली होती. मात्र त्यांनी दहा वर्षे याबाबत काहीच केले नाही, आम्ही या प्रकल्पाला सुरूवात केली. तर याबाबत विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत. स्मारकाबाबत विरोधक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुतळ्याची उंची आणि चबुतऱ्याची उंची यावरही  विरोधकांनी गैरसमज निर्माण केला आहे, असाही आरोप मुख्यमंत्र्यांनी  केला.