नरेंद्र मोदींच्या रुपाने ‘हिटलर’चा पुनर्जन्म: जितेंद्र आव्हाड

0
333

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – नागरिकत्व कायद्याचा विरोधात देशभरात आंदोलन सुरु  याचे राजकीय पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

देशात स्वातंत्र्यानंतर ही सर्वात मोठी लढाई आहे. मुस्लिमांचे नाव समोर करुन हिंदूंना गाफील ठेवण्याची ही नीती आहे. आसाम राज्यात १४ लाख हिंदू बांधवांकडे कागदपत्रे नाहीत. महाराष्ट्रातही ऊसतोड कामगार, पारधी समाज, असे अनेक समाज आहेत ज्यांच्याकडे पूर्वजांची कागदपत्रे सापडणार नाहीत. त्यामुळे नागरिकत्व कायद्याचा फटका त्यांना सुद्धा बसणार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये आयोजित मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तर मोदींच्या रुपाने ‘हिटलर’चा पुनर्जन्म झाला आहे. लवकरच सोशल मीडियासाठी कायदा आणणार आहेत. तेव्हा तुम्ही काढलेले फोटो किंवा तुम्ही कोणासोबत संभाषण केले, हे सुद्धा मोदी यांना कळणार आहे.