पुणे, दि. २०(पीसीबी)- पूणे जिल्ह्यात एकाच दिवशी पाण्यात बुडन ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१९) घडली.
पहिल्या घटनेत चासकमान धरणात बुडून कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये परराज्यातील २ विद्यार्थी आणि २ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चासकमान धरणात चार विद्यार्थी पोहण्यासाठी गेले होते. पोहताना चारही मुले बुडाली. चारही मुलांना बाहेर काढण्यात यश आले असुन चाकण येथील युनिकेअर रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
तर दुसऱ्या घटनेत भाटघर धरणाच्या न-हे गावच्या तीरावर गुरुवारी (ता.१९)सायंकाळी पाचच्या सुमारास ५ विवाहित महिला बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नरे गावातील तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. यामध्ये एक मुलगी सुदैवाने बचावली.
दरम्यान घटनेची मिळताच तहसीलदार सचिन पाटील, राजगड चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.