दोन खासदारांचा पक्ष आज ३०० खासदारांचा झाला हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आहे – नरेंद्र मोदी

0
386

मुंबई,दि.६(पीसीबी) – आज भाजपचा चाळीसावा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओद्वारे आज भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी दोन खासदारांचा पक्ष आज ३०० खासदारांचा झाला हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आहे ,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कोरोनाशी लढताना संपूर्ण देश एकवटला आहे. सगळ्या जगाने भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकारने करोनाबाबत कठोर निर्णय घेतले आणि जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. कोरोनाशी लढा देताना आपण गरीबीशी लढतो आहोत ही बाबही महत्त्वाची आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाशी दोन हात करताना भारताने केलेल्या प्रयत्नांचे WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कौतुक केलं आहे. करोनाविरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कालही अवघ्या देशाचं धैर्य पाहण्यास मिळालं असल्याचं मोदींनी सांगितलं.